नवी दिल्ली: आयसीसी वर्ल्ड कप १९९९ इंग्लंडमध्ये झाला. या वर्ल्ड कपमध्ये आजच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी एक ऐतिहासिक अशी खेळी केली होती. भारताचा सलामीचा फलंदाज आणि यांनी वर्ल्ड कपच्या इतिहासातील विक्रमी अशी खेळी केली. या दोघांनी केलेला विक्रम तब्बल १५ वर्षानंतर मोडला गेला.

वाचा-
१९९९च्या वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद अझरूद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गट फेरीतून बाहेर पडमअयाीच शक्यता होती. कारण भारताने पहिला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि नंतर झिम्बाब्वेकडून पराभव स्विकारला होता. त्यामुळे २६ मे १९९९ रोजी होणारी श्रीलंकेविरुद्धची लढत भारतासाठी करो वा मरो अशीच होती.

वाचा-
तेव्हा श्रीलंकेचा संघ मजबूत होता. कर्णधार अर्जुन रणतुंगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरूवात चांगली झाली नाही. संघाच्या ६ धाव संख्येवर सदागोपन रमेश बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी जे काही केले त्याने क्रिकेटमधील नवा विक्रम नोंदवला गेला.

या दोघांनी प्रथम ५०, १००, १५० त्यानंतर २०० आणि थेट ३०० धावांची भागिदारी केली. या भागिदारी दरम्यान दोघांनी वैयक्तिक शतक पूर्ण केले.

वाचा-
भारतीय संघातील दादा अशी ओळख असलेल्या सौरव गांगुलीने १५८ चेंडूत १७ चौकार आणि ७ षटकारांसह १८३ धावांची खेळी केली. वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाकडून करण्यात आलेली ही आजपर्यंतची सर्वोच्च खेळी आहे. विशेष म्हणजे गांगुलीचे वर्ल्ड कपमधील हे पहिले शतक होते. त्याआधी कपिल देव यांनी १९८३च्या वर्ल्ड कपमध्ये १७५ धावा केल्या होत्या. लंकेविरुद्धच्या सामन्यात राहुल द्रविडने १२९ चेंडूत १४५ धावा केल्या.

वाचा-

गांगुली आणि द्रविड यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३१८ धावांची भागिदारी केली. तर भारताने ५० षटकात ३७५ धावा केल्या. उत्तरादाखल लंकेला २१६ धावा करता आल्या. भारताकडून रॉबिन सिंगने पाच विकेट घेतल्या आणि भारताने हा सामना १५७ धावांनी जिंकला. गांगुली-द्रविडचा हा विक्रम २०१५च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि मार्लन सॅमुअल्स यांनी मोडला. त्यांनी ३७२ धावांची भागिदारी केली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here