मुंबई: भारताचे माजी अष्ठपैलू क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक यांचा आज ५८वा वाढदिवस आहे. ८०च्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू अशी शास्त्री यांची ओळख होती. त्यानंतर १९९० ते २००० या काळात त्यांनी समालोचक म्हणून उत्तम काम केले. क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या आवाजाची जादू अद्याप लक्षात आहे. युवराज सिंगने सहा चेंडूवर मारलेले सहा षटकार असोत की २०११ सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये महेंद्र सिंह धोनीने मारलेला विजयी षटकार असो, या दोन्ही क्षणात रवी शास्त्री यांनी त्याचा आवाज दिला होता.

वाचा-
रवी शास्त्री यांनी २१ फेब्रुवारी १९८१ रोजी न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. भारताकडून त्यांनी ८० कसोटी सामन्यात ११ शतक आणि १२ अर्धशतकांसह ३ हजार ८३० धावा केल्या. तर १५१ विकेट घेतल्या. वनडेत त्यांनी १०४ सामन्यात ४ शतकांसह ३ हजार १०८ धावा आणि १२९ विकेट घेतल्या होत्या. १९९१ साली रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत १५ धावात ५ विकेट घेतल्या होत्या.

एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम

रवी शास्त्री यांनी १० जानेवारी १९८५ रोजी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बडोदराचा गोलंदाज तिलक राज याच्या एकाच षटकात सहा सिक्स मारले होते. या सामन्यात रवी शास्त्रींनी १२३ चेंडूत द्विशतक झळकावले होते. तेव्हा शास्त्रींचे द्विशतक सर्वात जलद द्विशतक ठरले होते. या खेळीत त्यांनी १३ चौकार आणि १३ षटकार मारले होते.

प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यशस्वी ठरले. २०१७ साली ते भारतीय संघाचे झाले. २०१९ मध्ये त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली. तर दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका ५-१ने जिंकली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here