ट्वेन्टी-२० विश्वचषक आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे. हा विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार होता. पण या वर्षी विश्वचषक न खेळवण्याचे कारण ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने सांगितले आहे. त्यामुळे आता विश्वचषक रद्द करणे ही आयसीसीसाठी फक्त औपचारीकता उरली आहे, असे मत चाहते व्यक्त करत आहेत.

करोना व्हायरसचा प्रसार पाहता यावर्षी विश्वचषक खेळवला जाऊ नये, असे मत यापूर्वी काही आजी-माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले होते. त्यामुळे करोना व्हायरसमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवायचा की नाही, हे गुरुवारच्या आयसीसीच्या बैठकीमध्ये ठरणार होते. ऑस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार होता. पण ऑक्टोबरमध्ये सर्व काही सुरळीत होईल का, हा प्रश्न आयसीसीला होता. त्यामुळे त्यांनी ही बैठक बोलावली होती.

वाचा-

आसीसीने ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत सावध पाऊल उचलले होते. कारण एवढ्या लवकर ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत घाई करून निर्णय घेतला जाऊ नये, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत ट्वेन्टी-२० विश्वचषकावर चर्चा करण्यात आली. पण ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबतचा निर्णय त्यांनी १० जूनपर्यंत पुढे ढकलला होता. पण आता ऑस्ट्रेलियाने जो निर्णय घेतला आहे ते पाहता आयसीसीला कहा विश्वचषक रद्द करण्यावाचून दुसरा पर्याय सध्या तरी दिसत नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष केव्हिन रॉबर्ट्स यांनी सांगितले की, ” या वर्षी विश्वचषक खेळवणे ही मोठी जोखीम ठरू शकते. त्यामुळे या वर्षी होणारा विश्वचषक पुढे ढकलला तर बरे होईल. यामुळे आम्हाला मोठे नुकसान होणार आहे. पण हे करण्यावाचून दुसरा पर्याय सध्यातरी दिसत नाही.”

एकिकडे विश्वचषक या वर्षी न खेळवण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणत आहे. पण भारताबरोबर चार कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यासाठी मात्र ते तयार आहे. ऑस्ट्रेलियाने काल आपला आगामी स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये त्यांनी भारताच्या दौऱ्याचा समावेश केला आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊन चार कसोटी, तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here