
आशिया चषकात किती सामने होतील, जाणून घ्या…
आशिया कपमध्ये ६ संघ सहभागी होत आहेत. हे ६ संघ दोन गटात विभागलेले आहेत. भारत आणि पाकिस्तान अ गटात आहेत. तर ब गटात श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान आहेत. पात्रता फेरीतून एक संघ निवडला जाईल. २१ ऑगस्टपासून हाँगकाँग, यूएई, कुवेत आणि सिंगापूर या ४ संघांमधील पात्रता फेरी सामने सुरू झाले आहेत. पात्रता फेरीतील विजेता संघ भारत-पाकिस्तान गटात असेल. सहभागी झालेल्या या ६ संघांमध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत. यातील १० सामने दुबईत तर तीन सामने शारजाहमध्ये होणार आहेत. यामध्ये ग्रुप स्टेजमधील सर्व संघांमध्ये एकूण ६ सामने खेळवले जातील. यानंतर टॉप-२ संघ सुपर-४ मध्ये पोहोचतील, जिथे सर्व संघ एकमेकांविरुद्ध ६ सामने खेळतील. त्यानंतर सुपर-४ मधील टॉप-२ संघ अंतिम फेरीत विजेतेपदाचा सामना खेळतील. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ सामने पाहायला मिळू शकतात. त्यामुळे या स्पर्घेत आता कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times