क्रिकेट चाहच्यांसाठी सध्याच्या घडीला एक आनंदाची बातमी आहे. कारण एक संपूर्ण क्रिकेटचा संघ करोनामुक्त झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी या संघातील सर्व खेळाडूंच्या करोना चाचणी घेण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचा अहवाल आता सर्वांसमोर आला आहे. या संघांतील सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटीव्ह आला असून हा संघ करोनामुक्त असल्याचे आता म्हटले जात आहे.

करोनाच्या भितीमुळे वेस्ट इंडिजच्या संघातील खेळाडू इंग्लडच्या दौऱ्यावर जाण्यासाठी घाबरत होते. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या सर्व खेळाडूंची करोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये संघातील एकाही खेळाडूला करोना झाला नसल्याचे पुढे आले. त्यामुळेच आता वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर निघाला होता आणि काही मिनिटांमध्येच ते इंग्लंडला पोहोचला आहे. आज वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचला असून त्यांना पुढे १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

करोना व्हायरसनंतरही पहिली मालिका इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणार आहे. या दोन्ही देशांमध्ये सुरुवातीला तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेची सुरुवात ८ जुलैपासून होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना ८-१२ जुलै या कालावधीमध्ये एजेस बाऊल येथे होणार आहे. त्या़नंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना १६ ते २० जुलै या कालावधीमध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना २४-२८ जुलै या कालावधीत याच ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे.

खेळाडू तीन आठवड्यांसाठी क्वारंटाइन होणारया मालिकेसाठी सुरक्षेचे उपाय घेतले जाणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना तब्बल तीन आठवडे क्वारंटाइनमध्ये राहावे लाणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये ९ जूनला पोहोचणार आहे. त्यानंतर ओल्ड ट्रॅफर्ड येथे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची व्यवस्था करण्यात येणार आहे. तीन आठवडे क्वारंटाइन झाल्यानंतरच वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना क्रिकेट मालिका खेळता येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना अजून १४ दिवस पहिल्या सामन्याची वाट पाहावी लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here