पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू त्वेषाने मैदानात उतरत असतात. कारण पाकिस्तानबरोबरचा प्रत्येक सामना त्यांना जिंकायचा असतो. त्यामुळेच जपाकिस्तानविरुद्ध आपली सर्वोत्तम कामगिरी व्हावी, असे प्रत्येक भारताच्या क्रिकेटपटूला वाटत असते. सिद्धू यांनाही असेच वाटत होते. पण पाकिस्तानचा गोलंदाज त्यांना त्रास देत होता. त्यावेळी सिद्धू यांनी पाकिस्तानच्या कर्णधाराला मैदानातच धमकी दिल्याचे पाहायला मिळाले होते.
नेमके घडले तरी काय…ही गोष्ट आहे १९९६ साली घडलेली. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अटीतटीचा सामना सुरु होता. त्यावेळी सिद्ध फॉर्मात होते, ते ९० धावांवर फलंदाजी करत होते. काही चेंडूमध्ये ते आपले शतक झळकावण्यासाठी सज्ज होते. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अकिब जावेद हा सिद्धू यांच्याजवळ आला आणि त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. एक षटक सुरु असताना सिद्धू थेट आपली बॅट घेऊन सोहेल यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचा कर्णधार आमिर सोहेलला धमकी वजा इशारा दिला. त्यांनी सोहेलला सांगितले की, तू तुझ्या गोलंदाजांना समज दे, नाहीतर परीणाम वाईट होतील. त्यानंतर नेमके काय घडले, हे सोहेलने सिद्धू यांना विचारले. त्यावर सिद्धू म्हणाले की, तुझा वेगवान गोलंदाज काहीही बोलला तरी चालेल. पण तो माझ्याबाबत अपशब्द वापरत आहे, ही गोष्ट मी खपवून घेणार नाही. त्यानंतर सोहेल यांनी सिद्धू यांना शातं राहण्याचा सल्ला दिला. त्यावेळी सिद्धू यांच्याबरोबर भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर होता. त्यावेळी सचिनने सिद्धू यांना शांत केले आणि त्यांना फलंदाजी करायला सांगितली.
या गोष्टीनंतर सोहेल यांनी एक खुलासा केला आहे. सोहेल म्हणाले की, ” सिद्धू या प्रकरणाला मीठ-मसाला लावून सांगत आहेत. ते सांगतात तसे काही घडले नव्हते. मी त्यांना अकिब जावेदबरोबर सामन्यानंतर चर्चा करू असेही सांगितले होते. बरीच लोकं मला याबाबत विचारतात, त्यांना काही तरी भयंकर घडले असे वाटते. त्यामुळेच मला या गोष्टीचा खुलासा करणे गरजेचे वाटले.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times