वाचा-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान अध्यक्ष गांगुलीने सर्व संघटनांना पत्र लिहले आहे. या वर्षी स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आयोजित करावी लागणार आहे. यासाठी गरज पडली तर प्रेक्षकांशिवाय मोकळ्या मैदानात घेण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.
करोनामुळे जगातील सर्वात श्रीमंत अशी ही टी-२० स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. आता देशात पुन्हा क्रिकेट सुरू करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. याची माहिती गांगुलीने पत्रात सर्व राज्य संघटनांना दिली. क्रिकेट लवकरच हळूहळू सुरू होईल. पण प्रशिक्षण आणि अन्य देशांसोबतचे सामने यासाठी काही वेळ जाईल.
वाचा-
आयपीएलचा १३वाा हंगाम २९ मार्च पासून सुरू होणार होता. पण करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन बीसीसीआयने त्याला स्थगिती दिली. आता यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप बाबत आयसीसी काय निर्णय घेते त्यावर आयपीएलचे भवितव्य अवलंबून असेल.
जागतिक क्रिकेटमधील नियोजन पाहून जर टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलला तर आयपीएलसाठी वेळ मिळेल. ज्यात भारतीयांसह परदेशी खेळाडू खेळू शकतील. करोना व्हायरस देशात पसरण्याआधी २०१९-२० मधील क्रिकेट सत्र पूर्ण झाले होते, गांगुलीने म्हटले आहे. आता नव्या क्रिकेट सत्रातील सामन्यांचे नियोजनाची तयारी करावी लागले.
वाचा-
दरम्यान, गेल्या काही दिवसात भारतात आयपीएल होणार नसेल तर आमच्या देशात घ्यावी अशी ऑफर बीसीसीआयला श्रीलंका आणि युएईने दिली आहे. या ऑफरवर बीसीसीआयने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावर्षी IPLचे आयोजन करणे हे बीसीसीआयसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. स्पर्धाच रद्द झाली तर कोट्यवधीचे नुकसान होईल. बीसीसीआयकडून आयपीएलच्या आयोजनाचे सर्व पर्याय खुले आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times