भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक गूड न्यूज आली आहे. कारण येत्या सोमवारपासून भारतामध्ये क्रिकेटची लीग सुरु होणार आहे. त्यामुळे आता सोमवारपासून भारतीयांना क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.

भारतामध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये एकही क्रीडा स्पर्धा खेळवण्यात आली नव्हती. त्यामुळे सर्वच खेळांचे मोठे नुकसान झाले आहे. पण आता भारतातील परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच क्रीडाबाबत काही गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सोमवारपासून क्रिकेट चाहत्यांनी लीगचा आनंद घेता येणार आहे.

आयपीएलसाठी बीसीसीआयटने चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. बीसीसीआय संघ मालकांबरोबर आयपीएलच्या आयोजनाबाबत चर्चा करत आहे. त्यामुळे आयपीएल लवकरच तुम्हाला मैदानात पाहायला मिळू शकते. त्यासाठी बीसीसीआय जोरदार प्रयत्न करत आहे. कारण जर आयपीएल झाली नाही तर बीसीसीआयला ४ हजार कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असे म्हटले जात आहे.

भारतामध्ये सोमवारपासून पंजाब टी-१० या क्रिकेट लीगला सुरुवात होणार आहे. या लीगमध्ये सहा संघांचा समावेश असेल. ही लीग १६ दिवस चालणार असून एकूण ३३ सामने यामध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता ही लीग खेळवताना कोणते सुरक्षिततेचे उपाय घेतले जातात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे बीसीसीआय मात्र करोना व्हायरसमुळे भारताचे दौरे रद्द करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण बीसीसीआयने काल श्रीलंकेचा दौरा रद्द केला होता. शुक्रवारी पुन्हा एकदा बीसीसीआयने झिम्बाव्बेचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर ऑगस्ट महिन्यात जाणार होता. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार होता. पण हा दौरा रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. त्यामुळे एकिकडे बीसीसीआय आपेल दौरे रद्द करत असताना भारतामध्येच कसे क्रिकेटचे सामने खेळवले जाऊ शकतात, असा प्रश्न उठू शकतो. पण सध्याच्या घडीला बीसीसीआय आयपीएलचा सर्वप्रथम विचार करत आहे. त्यामुळे बीसीसीआय काही निर्णय घेत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here