नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीवर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याआधी अनेक वेळा टीका केल्याचे तुम्ही वाचले असेल. पण आता गंभीर धोनीबद्दल जे बोलला आहे तसे याआधी कोणीच बोलले नाही. धोनीला क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर मानले जाते. भारताला आयसीसीच्या दोन वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीने एक मोठी चूक केल्याचे गंभीरने म्हटले. जर त्याने ही चूक केली नसते तर अनेक विक्रम झाले असते.

वाचा-
धोनीच्या नावाची चर्चा ही नेहमी त्याचे नेतृत्व आणि शानदार विकेटकिपिंगसाठी केली जाते. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन देखील धोनीने वनडे क्रिकेटमध्ये ५०च्या सरासरीने १० हजार ७७३ धावा केल्या आहेत. त्याची ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असल्याचे गंभीर म्हणाला.

वाचा-
धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गंभीरने स्टार स्पोट्सच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात सांगितले की, जर धोनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला असता तर अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करू शकला असता. तसेच त्याला कर्णधारपद दिले गेले नसते तर तो वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता आणि अनेक विक्रम झाले असते.

वाचा-

क्रिकेट जगताने सर्वात सुंदर गोष्ट मिस केली
कदाचित क्रिकेट जगताने एक सुंदर गोष्ट मिस केली. ती म्हणजे धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहिले नाही. जर तो तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास आला असता तर क्रिकेटने एक वेगळाच खेळाडू पाहिला असता. कदाचित त्याच्या नावावर अधिक धावा आणि विक्रम असते. कर्णधारपद नसते तर तो आणखी चांगला खेळाडू झाला असता.

वाचा-
क्रमांक तीनवर धोनीने पाटा विकेटवर आक्रमक गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी केली असती. विचार करा धोनीने किती विक्रम केले असते, असे गंभीर म्हणाला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here