लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे ४३ सैनिक जखमी झाले आहेत. या झटापटीत १७ भारतीय जवान शहीद झाल्याचे लष्कराने काल रात्री उशिरा सांगितले. या घटनेवर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. इरफाननेही याबाबत एक ट्विट केले होते. त्यानंतर त्याचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळाले आहे.
भारतीय जवान शहीद झाल्यावर बरेच जण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण आपल्या देशाचे रक्षण करताचना जवानांनी दिलेली ही आपल्या प्राणांची आहुती सर्वांसाठी मोलाची ठरताना दिसत आहे. त्यामुळेच इरफानही यावेळी जवान शहीद झाल्यावर भावूक झालेला पाहायला मिळाला आणि त्याने एका ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इरफान म्हणाला की, ” काही वेळेला सीमेवर आपल्या जवानांना शहीद व्हावे लागते. माझी अशी इच्छा आहे आणि मी त्यासाठी प्रार्थना करतो की, यावर एक मार्ग असा काढायला हवा, जेणेकरून एका आईला आपला मुलगा गमावल्याचे दु:ख होणार नाही. कोणत्याही पित्याला आपला वंश गमवावा लागू नये. एका भावाला आपला मित्र गमवावा लागू नये आणि एका बहिणीला एक हात गमवावा लागू नये ज्यावर ती राखी बांधते.”
इरफानचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले आहे. कारण भाराततील बऱ्याच लोकांनी या ट्विटला चांगला प्रतिसाद दिला आहे आणि आपल्या परिजनांना हे ट्विट पाठवले आहे. त्यामुळे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणाऱ्या इरफानच्या ट्विटची जोरदार चर्चा सध्याच्या घडीला भारतामध्ये होताना दिसत आहे. इरफानच्या या ट्विटवर बऱ्याच जणांनी प्रतिक्रीयाही दिल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times