काही दिवसांपूर्वी आफ्रिदी काही लोकांना मदत करत होता. त्यावेळी तो बऱ्याच जणांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे आता त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही करोनाचा धोका असल्याचे म्हटले जात आहे. आफ्रिदी गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील करोनाग्रस्त लोकांना तसेच अन्य नागरिकांना मदत करत आहे. त्याने सोशल मीडियावरून मदत कार्यचे फोटो शेअर केले होते. पण ही मदत करत असताना त्याने अनेक वेळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीर संदर्भात बेताल वक्तव्य केले होते.
आफ्रिदीला करोना झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचे काय झाले, हा विचा़रही सुरु झाला आहे. कारण करोना होण्यापूर्वी आफ्रिदी पाकिस्तानमधील बऱ्याच लोकांना मदत करत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आफ्रिदीला करोना झाल्यावर तो ज्या लोकांच्या संपर्कात आला होता, त्यांचे नेमके काय झाले, याबाबतही लोकांना जाणून घेण्यात उत्सुकता आहे.
करोना व्हायरस झाल्यानंतर आफ्रिदीची तब्येत चिंताजनक असल्याची गोष्ट वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे काही जणं चिंतेमध्ये होते. या अफवा पसरू नये, यासाठी आफ्रिदीने एक फेसबूकवर लाइव्ह केले होते. यामध्ये आफ्रिदी म्हणाला की, ” माझ्या तब्येतीबाबत मला काही गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या, त्यामुळे मला तुमच्याबरोबर संवाद साधावासा वाटला. करोना झाल्यावर २-३ दिवस थोडे वाईट गेले, पण सध्याच्या घडीला माझी तब्येत सुधारत आहे. ”
आफ्रिदीने पाकिस्तानमधील काही मंदिरातील गरजू लोकांना मदत केली होती. त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीर भागातली आफ्रिदीने गेला होता आणि तेथील लोकांना त्याने मदतीचा हात पुढे केला होता. त्यामुळे आता या सर्व लोकांना करोना धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आफ्रिदीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला करोनाची चाचणी करावी लागणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times