या वर्षी आयपीएल जर खेळवली गेली नाही तर बीसीसीआयला मोठा फटका बसू शकतो. त्यासाठी बीसीसीआयने यंदाचे आयपीएल आयोजित करण्यासाठी कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. पण आयपीएलच्या मार्गात आता पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ अडथळा आणू पाहत आहे. त्यासाठी पाकिस्तानने एक गोष्ट करण्याचे ठरवले आहे.

बीसीसीआयने या वर्षी आयपीएल आयोजित करण्यासाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर हा कालावधी घेण्याचे ठरवले आहे. जर ऑस्ट्रेलियामध्ये होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला तर आयपीएल होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण या मार्गात आता पाकिस्तान अडथळा निर्माण करत असल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तान नेमका काय अडथळा निर्माण करते आहे…ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पूर्वी आशिया चषच स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाऊ शकते. कारण या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असेल तरी तिथे खेळण्यास भारताने नकार दिला आहे. ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. या महिन्यामध्येच बीसीसीआय आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण भारताने या महिन्यात आयपीएल आयोजित करू नये, यासाठी पाकिस्तानने प्रयत्न सुरु केले आहेत.

‘इनसाईट स्पोर्ट्स’ला पाकिस्तान क्रिकेट मंडळातील एका व्यक्तीने मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, ” पाकिस्तानला सप्टेंबर महिन्यामध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन व्हावे, असे वाटत आहे. हा कालावधी आयपीएल आयोजित करण्यासाठी दिला जाऊ नये, असे पाकिस्तानचे स्पष्ट मत आहे. याबाबत पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आशिया क्रिकेट परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संवादही साधला आहे.”

भारताने आशिया चषक पाकिस्तानमध्ये खेळवण्यास नकार दिल्यामुळे ही गोष्ट घडत असल्याचे काही जणांना वाटत आहे. भारताच्या विरोधामुळे ही स्पर्धा कदाचित श्रीलंकेमध्ये खेळवली जाऊ शकते, असे दिसत आहे. पण ही स्पर्धा खेळवली गेली तर आयपीएलचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते, असे दिसत आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द झाली नाही तर बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनामध्ये बदल करावा लागेल, असे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here