वाचा-
आयपीएलच्या आयोजनासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने आयपीएलसाठीच्या शहराची निवड केली आहे. IPLच्या १३व्या हंगामासाठी चार स्टेडियम निश्चित केली आहेत.
वाचा-
पीटीआयच्या रिपोर्टनुसार मुंबई शहराचा आयपीएलसाठी विचार करत आहे. या शहरात बायो सिक्योर झोन तयार करून स्पर्धा आयोजन होऊ शकते. करोना व्हायरसमुळे २९ मार्च पासून होणारी आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता ताज्या रिपोर्टनुसार सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळात IPLहोऊ शकते. यातील सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप बाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे बीसीसीआयला IPLच्या नियोजनाचा अंतिम निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत.
वाचा-
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ही स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भातचा विचार अगदी सुरुवातीच्या स्तरावर आहे. ऑक्टोबर महिन्यात जर याचे आयोजन करायचे असेल तर मुंबईतील स्थिती नियंत्रणात हवी. मुंबईत चार सर्वोत्तम स्टेडियम उपलब्ध आहेत. बीसीसीआय आणि स्पर्धेचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोस्टर्स साठी बायो सिक्योर झोन तयार केल्यास सर्व गोष्टी शक्य आहेत.
वाचा-
देशातील सर्वाधिक करोना रुग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे जर आयपीएलचे आयोजन मुंबईत करायचे असेल तर त्यासाठी करोना स्थिती नियंत्रणात हवी. या स्पर्धेसाठी मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील ही मैदाने उपलब्ध आहेत.
वाचा- …
करोनामुळे मार्च महिन्यापासून क्रिकेट स्पर्धा बंद आहे. सध्या वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दोन्ही देशांतील कसोटी मालिकेमुळे क्रिकेटच्या आयोजनाला बळ मिळेल. अशाच पद्धतीने मुंबईत सुरक्षित झोन करून आयपीएल स्पर्धा होऊ शकेत, असा बीसीसीआयचा विचार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times