३ सामने, ३ पराभव अन् एकच चूक

या तिन्ही सामन्यांमध्ये एकच गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे १९वे षटक. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या तिन्ही सामन्यांमध्ये हे षटक भारताचा हुकमी एक्का असलेल्या भुवनेश्वर कुमारनेच टाकले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या १९व्या षटकात भुवीने १९ धावा दिल्या होत्या आणि भारताच्या हातून सामना निसटला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील १९व्या षटकात भुवीने १४ धावा दिल्या होत्या. आज झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भुवीने १६ धावा दिल्या होत्या. त्यामुळे भारतासाठी १९वे षटक धोक्याचे ठरते आहे. त्यामुळे आता या १९व्या षटकाचे करायचे काय, हा मोठा प्रश्न आता रोहित शर्माबरोबर भारतीय संघाला सोडवावा लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here