वाचा-
श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांनी ठामपणे वानखेडे मैदानावरील भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना फिक्स झाला होता असा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले होते. त्यानुसार २०११च्या निवड समितीचे प्रमुख अरविंदा डिसिल्वा, कर्णधार , महेला जयवर्धने आणि सलामीवीर उपल तरंगा यांची अनेक तास चौकशी करण्यात आली.
वाचा-
या प्रकरणी संबंधित खेळाडूंनी दिलेल्या उत्तरावर आम्ही समाधानी आहोत. ही चौकशी आम्ही थांबवत असल्याचे उच्च पोलिस अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले. श्रीलंकेच्या खेळाडूंनी या सामन्यात फिक्सिंग केल्याचे कोणतेही पुरावे सापडेल नाहीत. त्यामुळे ही चौकशी थांबवत आहोत, असे पोलिस म्हणाले. भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यावेळी महिंदनंदा अळूठगमगे हे लंकेचे क्रीडा मंत्री होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी न्यूज फर्स्टला दिलेल्या मुलाखतीत वर्ल्ड कपमधील हा सामना फिक्स झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर २०११च्या लंकेच्या वर्ल्ड कप समितीचे प्रमुख असेलल्या अरविंदा डिसिल्वाने याची चौकशी करण्याची मागणी केली होती.
वाचा-
काल संगकाराची चौकशी सुरू असताना त्याच्या चाहत्यांनी क्रीडा मंत्रालयाच्या बाहेर निदर्शने केली होती. सरकार माजी खेळाडूंना त्रास देण्यासाठी चौकशी करत असल्याचा आरोप चाहत्यांनी केला होता. तर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले साजिथ प्रेमदासा यांनी सोशल मीडियावरून या चौकशीबद्दल नाराजी व्यक्त करत सरकार २०११च्या वर्ल्ड कपमधील देशाच्या हिरो कुमार संगकारासह अन्य खेळाडूंचा छळ करत असल्याचे म्हटले होते.
वाचा-
भारताकडून पराभव झालेल्या अंतिम सामन्यात संगकारा श्रीलंकेचा कर्णधार होता. प्रथम फलंदाजी करत त्यांनी भारताला २७५ धावांचे आव्हान दिले होते. भारताने गौतम गंभीर (९७) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद ९१) यांच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. काल डिसिल्वाची चौकशी पथकाकडून तब्बल सहा तास चौकशी केली. डिसिल्वा हे २०११च्या श्रीलंकेच्या संघाचे मुख्य निवड समितीचे प्रमुख होते.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times