करोना व्हायरसमुळे क्रिकेट विश्व ठप्प झालेले होते. पण चाहत्यांसाठी आता एक खूष खबर आली आहे. जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीनंतर चाहत्यांना आता क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी आता मिळणार आहे.

वाचा-

करोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांना लाईव्ह सामन्यांचा आनंद घेता येत नव्हता. पण आता त्यांना लाईव्ह सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. कारण आता क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने सुरु होणार आहेत आणि या सामन्यांचा आनंद चाहत्यांना घेता येणार आहे.

करोना व्हायरसमुळे अजूनही ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. आयसीसीने याबाबत अजून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे विश्वचषकाच्या आयोजनावर आयपीएलचे भवितव्य अवलंबून आहे. जर विश्वचषक रद्द झाला तर आयपीएल खेळवले जाऊ शकते, नाहीतर बीसीसीआयला जवळपास चार हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

वाचा-

सध्याच्या घडीला विश्वचषक होणार की नाही, हे जरी माहिती नसले तरी क्रिकेटची मालिका मात्र नक्की लवकरच खेळवली जाणार आहे. या क्रिकेट मालिकेचे थेट प्रसारण आता चाहत्यांना पाहता येणार आहे. कारण तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच क्रिकेटची मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये कसोटी मालिका ८ जुलै पासून सुरु होणार आहे. या मालिकेचे थेट प्रसारण भारतीय चाहत्यांना दुपारी ३.३० वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे.

वाचा-

तीन महिन्यांनंतर होणारा पहिला क्रिकेटचा सामना कसा असेल, याबाबत बऱ्याच चाहत्यांना उत्सुकता आहे. कारण करोनानंतर क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या नव्या नियमांनुसार क्रिकेट कसे खेळवले जाणार आहे, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. त्यामुळे आता तीन महिन्यांनंतर होणाऱ्या पहिल्या क्रिकेट सामन्याचे स्वागत चाहते कसे करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here