करोनानंतर चार महिन्यांनंतर प्रथमच खेळवण्यात आलेल्या सामन्यात अखेर बाजी मारली ती वेस्ट इंडिजने. इंग्लंडने सामन्याच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाछलाग करत वेस्ट इंडिज इंग्लंडवर थरारक चार विकेट्स राखत विजय मिळवला. वेस्ट इंडिजासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला. कारण तब्बल २० वर्षांनंतर त्यांना इंग्लंडमध्ये पहिला कसोटी विजय मिळवता आला आहे. या विजयाचे नेमके रहस्य आहे तरी काय, याचा विचार सर्वच जण करत आहेत. पण हे रहस्य आता उलगडलेले ते वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने.

काही दिवसांपूर्वी सॅमी चांगलाच चर्चेत आला होता. सॅमीने आपल्या़बरोबरही वर्णद्वेष झाल्याचे सांगितले होते. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना मला कालू म्हटले जायचे, असे सॅमीने सांगितले होते. त्यावेळी सॅमीला या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. पण हा अर्थ समजल्यावर त्याने आयपीएलच्या खेळाडूंना नाव जाहीर करण्याची धमकीही दिली होती.

वेस्ट इंडिजच्या विजयाचे रहस्य…वेस्ट इंडिजच्या या ऐतिहासिक विजयाचे रहस्य सांगितले आहे ते माजी कर्णधार डॅरेन सॅमीने… याबाबत सॅमी म्हणाला की, ” या मालिकेपूर्वी एक अशी घटना घडली की ज्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाला बळ मिळाले. या मालिकेपूर्वी वर्णद्वेषाविरुद्धचे आंदोलन पेटले होते. आतापर्यंत बऱ्याचदा वेस्ट इंडिजच्या खेळाडूंबाबतही वर्णद्वेषाच्या गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. हा सर्व राग त्यांनी आपल्या कामगिरीच्या माध्यमातून काढला आणि त्यांना विजय मिळवता आला. वेस्ट इंजिजच्या विजयाचे हेच रहस्य आहे, असे मला तरी वाटते.”

वेस्ट इंडिजच्या विजयात तीन खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले होते. वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रिएलने या सामन्यात इंग्लंडचे कंबरडे मोडले होते. त्याने या सामन्यात ९ विकेट्स मिळवल्या आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला होता. त्याचबरोबर कर्णधार जेसन होल्डरनेही या सामन्यात दमदार कामगिरी केली. कारण पहिल्या डावात होल्डरने सहा विकेट्स मिळवत इंग्लंडचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे इंग्लंडला जास्त धावा करता आल्या नाहीत. त्याचबरोबर मोक्याच्या क्षणी चांगली फलंदाजी करत होल्डरने वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. वेस्ट इंडिजच्या जेरमिन ब्लॅकवूड हादेखील या विजयाचा नायक ठरला. इंग्लंडने वेस्ट इंडिजला विजयासाठी २०० धावांचे लक्ष्य दिले होते. त्यावेळी आर्चर भेदक गोलंदाजी करत असताना ब्लॅकवूड हा खेळपट्टीवर ठाण मांडून राहीला आणि संघाकडून सर्वाधिक ९५ धावा करत संघाला पहिला विजय मिळवून दिला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here