ॲडलेडमधील ऐतिहासिक ओव्हल मैदानावर बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये लढत सुरु झाली आहे. बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी निश्चित करू शकतो. पण पाकिस्तान गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून उपांत्य फेरीसाठी मुख्य दावेदार आहे. पाकिस्तानसाठी आजचा सामना त्यांचं टी-२ विश्वचषकातील आपले आव्हान ठरवणारा आहे.
वाचा: टी-२० विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर; रोमहर्षक सामन्यात नेदरलँडकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव

गुणतालिका पाहता आपल्याला समजून घेता येईल कि, भारत ६ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे तर पाकिस्तान ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पण जर पाकिस्तान आजचा सामना जिंकला तर ६ गुणांसह भारताच्याही पुढे जाऊ शकतो. कारण, भारतापेक्षा पाकिस्तानचा नेट रनरेट सर्वात जास्त आहे. पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात पाकिस्तान जिंकला तर पाकिस्तानला २ गुण मिळतील आणि पाकिस्तान अधिक रानरेट असल्याने भारताच्या पुढे प्रथम क्रमांकावर जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारताला आजच्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव करणं, महत्त्वाचं ठरेल. तर दक्षिण आफ्रिकेच्या या पराभवामुळे त्यांचं टी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times