नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात सूर्याने विरोधी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत त्याने पाच सामन्यांत तीन अर्धशतके झळकावली आहेत.

क्रिकेटच्या दिग्गजांनाही सूर्याच्या फलंदाजीची खात्री आहे. मैदानात सर्वत्र चेंडू मारण्याची क्षमता सूर्यकुमारमध्ये आहे. हेच कारण आहे की त्याला सध्याच्या क्रिकेट जगतातील ३६० खेळाडू देखील म्हटले जाते. सूर्या टी-२० क्रमवारीत नंबर १ फलंदाज बनला आहे. दरम्यान, सूर्याचा गेम प्लॅन कसा असेल हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांनाही उत्सुकता असेल, ज्यामुळे तो रिलॅक्स राहून मॅचमध्ये सतत अशा इनिंग्स खेळू शकतो? सूर्यकुमार सामन्यापूर्वी प्रत्येक वेळी दोन नियमांचे पालन करतो. एक नियम त्याचा स्वतःचा असतो, तर दुसरा नियम त्याची पत्नी पाळते.

मचाणीवर असलेला शेतकरी जिवाच्या आकांताने ओरडला, शेजारचे धावत गेले, समोरचे दृश्य बघून हादरले
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सूर्यकुमारची पत्नी देविशा जवळजवळ प्रत्येक दौऱ्यावर सूर्यासोबत असते. तसेच, ती प्रत्येक वेळी सामन्यापूर्वी एक नियम पाळते. ती सूर्याचा फोन मॅचच्या खूप आधी आपल्याजवळ ठेऊन घेते. यामुळे सूर्यावर अतिरिक्त दबाव राहत नाही. हे देखील कारण आहे की सूर्या त्याच्या गेम प्लॅनबद्दल वेगळ्या झोनमध्ये असतो आणि त्यामुळे तो सतत अशा खेळी साकारु शकतो.

तसेच, नुकतेच सूर्याला असेही विचारण्यात आले होते की तो सामन्याच्या एक दिवस आधी कोणता गेम प्लॅन करतो? तुम्ही नेटचा जोरदार सराव करता की इतर काही रणनीतीवर काम करता? याला उत्तर देताना सूर्यकुमार याने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ‘गेल्या ४ वर्षांपासून मी हीच रणनीती अवलंबली आहे. त्याचा मला खूप फायदाही झाला आहे. मी सामन्याच्या अगदी आधी एक दिवस सुट्टी घेतो. मला जो काही सराव करावा लागतो तो मी दोन दिवस अगोदर करतो.

सूर्यकुमार पुढे म्हणाला, ‘एक दिवस आधी मी माझ्या पत्नीसोबत वेळ घालवतो आणि क्रिकेटबद्दल बोलत नाही. मी चांगला खेळो किंवा नको, माझी पत्नी मला नेहमीच साथ देते. तिने माझ्या मनात एक गोष्ट बिंबवली आहे, की मी जसा आहे तसाच राहिलो पाहिजे. मी चांगले खेळू किंवा नको.

सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा झंझावाती अर्धशतक झळकावत भारताने झिम्बाब्वेविरुद्ध २० षटकांत १८६/५ अशी मोठी मजल मारली. पण सूर्यकुमारने बॉलवर अगदी जोरदार फटकेबाजी करत सामन्याचा वेग पुन्हा बदलून टाकला, डेथ ओव्हर्समध्ये सहा चौकार आणि चार षटकार मारत २४४ च्या स्ट्राइक रेटने अफलातून फलंदाजी करत केवळ २५ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या. त्याच्या धडाकेबाज खेळी आणि मंत्रमुग्ध करणारे उंच फटके, यामुळे शेवटच्या पाच षटकात भारताला ७९ धावा मिळाल्या. आता भारत सेमी फायनलमध्ये पोहोचला असून भारताची ११ नोव्हेंबरला इंग्लंडशी लढत होणार आहे.

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’त ठाकरे पिता-पुत्र सहभागी होणार की नाही? महत्त्वाची माहिती समोर

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here