इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सूर्यकुमारची पत्नी देविशा जवळजवळ प्रत्येक दौऱ्यावर सूर्यासोबत असते. तसेच, ती प्रत्येक वेळी सामन्यापूर्वी एक नियम पाळते. ती सूर्याचा फोन मॅचच्या खूप आधी आपल्याजवळ ठेऊन घेते. यामुळे सूर्यावर अतिरिक्त दबाव राहत नाही. हे देखील कारण आहे की सूर्या त्याच्या गेम प्लॅनबद्दल वेगळ्या झोनमध्ये असतो आणि त्यामुळे तो सतत अशा खेळी साकारु शकतो.
तसेच, नुकतेच सूर्याला असेही विचारण्यात आले होते की तो सामन्याच्या एक दिवस आधी कोणता गेम प्लॅन करतो? तुम्ही नेटचा जोरदार सराव करता की इतर काही रणनीतीवर काम करता? याला उत्तर देताना सूर्यकुमार याने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ‘गेल्या ४ वर्षांपासून मी हीच रणनीती अवलंबली आहे. त्याचा मला खूप फायदाही झाला आहे. मी सामन्याच्या अगदी आधी एक दिवस सुट्टी घेतो. मला जो काही सराव करावा लागतो तो मी दोन दिवस अगोदर करतो.
सूर्यकुमार पुढे म्हणाला, ‘एक दिवस आधी मी माझ्या पत्नीसोबत वेळ घालवतो आणि क्रिकेटबद्दल बोलत नाही. मी चांगला खेळो किंवा नको, माझी पत्नी मला नेहमीच साथ देते. तिने माझ्या मनात एक गोष्ट बिंबवली आहे, की मी जसा आहे तसाच राहिलो पाहिजे. मी चांगले खेळू किंवा नको.
सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा झंझावाती अर्धशतक झळकावत भारताने झिम्बाब्वेविरुद्ध २० षटकांत १८६/५ अशी मोठी मजल मारली. पण सूर्यकुमारने बॉलवर अगदी जोरदार फटकेबाजी करत सामन्याचा वेग पुन्हा बदलून टाकला, डेथ ओव्हर्समध्ये सहा चौकार आणि चार षटकार मारत २४४ च्या स्ट्राइक रेटने अफलातून फलंदाजी करत केवळ २५ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या. त्याच्या धडाकेबाज खेळी आणि मंत्रमुग्ध करणारे उंच फटके, यामुळे शेवटच्या पाच षटकात भारताला ७९ धावा मिळाल्या. आता भारत सेमी फायनलमध्ये पोहोचला असून भारताची ११ नोव्हेंबरला इंग्लंडशी लढत होणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times