राहुल द्रविड नेमकं काय म्हणाले?
भारतीय संघातील बदलाविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल द्रविड म्हणाले की, ‘१५ जणांच्या स्कॉडमधील प्रत्येकाविषयी आम्ही सकारात्मक आहोत. या १५ खेळाडूंपैकी कोणाचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाल्यानंतर त्यातील कोणीही भारतीय संघाला कमकुवत करणार नाही. आम्ही अॅडलेडच्या खेळपट्टीचा अंदाज घेऊ. अॅडलेडच्या मैदानात आज झालेले काही सामने मी पाहिले. तिथली खेळपट्टी संथ असल्याचं दिसत आहे. तसंच फिरकीला साथ देणारी ही खेळपट्टी आहे. त्यामुळे आम्ही तेथील परिस्थितीनुसार संघाची निवड करू,’ असं द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रविवारी पार पडलेली भारत विरुद्ध झिम्बाब्वे ही लढत अगदीच एकतर्फी झाली. गटात पाकिस्तानला पराभूत करणारा आणि बांगलादेशला विजयासाठी संघर्ष करायला लावणारा झिम्बाब्वे भारतापुढे अगदीच कमकुवत ठरला. सूर्यकुमार यादव याने अखेरच्या काही षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८६ धावा केल्या. ही यंदाच्या वर्ल्ड कपमधील भारताची सर्वोच्च धावसंख्या ठरली. यानंतर भारताने झिम्बाब्वेचा डाव १७.२ षटकांत ११५ धावांत गुंडाळला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times