करोनामुळे क्रीडा विश्वाला धक्का देणारी एक घटना आज घडल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचे आज करोना व्हायरसमुळे निधन झाल्याची वाईट बातमी आली आहे.

काही दिवसांपूर्वी या खेळाडूला ताप आणि खोकला आला होता. त्यामुळे त्यांची करोना चाचणी झाली होती, यामध्ये ते करोना पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू रमेश टिकाराम यांचे आज करोनामुळे निधन झाले आहे. २९ जूनला त्यांना ताप आल्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आज अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश यांच्या पश्ताच पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

रमेश यांनी एक खेळाडू म्हणून जगभरात चांगले नाव कमावले होते. त्यांच्या या देदिप्यमान कामगिरीमुळे त्यांना भारताचे शात्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती असताना त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. भारतामध्ये २००१ साली पॅरा बॅडमिंटन स्पर्धा भरवण्यात आली होती. ही स्पर्धा भरवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

रमेश यांचे निधन झाल्याची बातमी भारताच्या पॅरा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष एन. सी. सुधीर यांनी दिली आहे. याबाबत सुधीर म्हणाले की, ” भारताचे दिग्गज पॅरा बॅडमिंटन खेळाडू रमेश टिकाराम यांचे आज करोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. ही बातमी तुम्हाला सांगताना मला फार वाईट वाटत आहे.”

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या १० खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. पाकिस्तानसाठी ही सर्वात धक्कादायक गोष्ट होती. पण जेव्हा या १० खेळाडूंमधील मोहम्मद हाफिझने खासगीपणे आपली करोना चाचणी केली तेव्हा तो करोना निगेटीव्ह आला होता. त्यामुळे पाकिस्तानमधील करोना चाचण्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण पाकिस्तानमधील चाचण्या योग्यपद्धतीने केल्या जातात का, याबाबत आता सवाल विचारले जात आहेत. पण पाकिस्तान सोडल्यास अन्य देशांच्या खेळाडूंना करोना झाला नसल्याचेच पाहायला मिळत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here