करोना व्हायरसमुळे क्रिकेट चार महिने ठप्प होते. आता एक मालिका सुरु असली तरी बाकी क्रिकेट अजूनही सुरु झालेले नाही. या कालावधीमध्ये खेळाडूंमध्येही मानसीक आणि शारीरिक बदल झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारताच्या या दिग्गज खेळाडूने आता निवृत्ती कधी घेणार, यावर आपले मत व्यक्त केले आहे.

सध्याच्या घडीला क्रिकेट ठप्प आहे. पण त्यानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे हे खेळाडूंसाठी नक्कीच सोपे नसेल. कारण चार महिने घरी बसल्यानंतर क्रिकेटसाठी लागणारा फिटनेस मिळवणे, हे सोपे काम नसेल. त्यामुळेच या दिग्गज क्रिकेटपटूने आता निवृत्तीचा विचार केल्याचे म्हटले जात आहे.

यापूर्वी काही महिने हा खेळाडू क्रिकेटपासून लांब आहे. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणे सोपे नसल्याचे म्हटले जात आहे. क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी आयपीएल ही या खेळाडूसाठी चांगली संधी होती. पण करोना व्हायरसमुळे आयपीएलही होऊ शकले नाही. त्यामुळे आता क्रिकेट सुरु कधी होणार आणि हा क्रिकेटपटू पुनरागमन करू शकणार का, हादेखील महत्वाचा प्रश्न आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळला होता. त्यानंतर वर्षभरात तो एकही सामना खेळलेला नाही. दुसरीकडे धोनीबरोबर आयपीएलमध्ये त्याला साथ देणारा भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगही बऱ्याच कालावधीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. त्यामुळे आता निवृत्तीचा विचार त्याला मनात डोकावत आहे.

याबाबत हरभजन म्हणाला की, ” आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला शरीर किती साथ देईल, हे सांगता येत नाही. आता सारं काही शरीरावर अवलंबून आहे. सध्याच्या घडीला प्रत्येक दिवस हा परीक्षेसारखा आहे. भारताकडून खेळणे माझे स्वप्न होते, ते पूर्ण झाले. ही गोष्ट मी कधीही विसरू शकणार नाही. पण सध्याच्या घडीला निवृत्ती घ्यायची की नाही, हे शरीर ठरवेल. सध्याच्या घडीला मी फिटनेसवर लक्ष देत आहे. प्रत्येक दिवशी मी जिम आणि योगा करत आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here