सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे भारतातील क्रिकेट ठप्प आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका खेळवायला हवी, असेही म्हटले जात होते. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेची मागणी केली होती. पण भारताच्या आजी-माजी खेळाडूंनी या प्रस्तावाला विरोध केला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर नेहमीच तणावाचे वातावरण असते. कारण कधी हल्ला होईल, हे सांगता येत नाही. पण जेव्हा माणसं आनंदी राहतात तेव्हा ते जास्त फिट असतात आणि जास्त आयुष्य जगतात, असे म्हटले जाते. त्यामुळे सध्याच्या करोनाच्या काळातही भारतीय जवानांनी आनंद राहण्याचा एक मार्ग निवडला आहे.
भारतीय जवानांचे काम हे सर्वांनीच पाहिले आहे. डोळ्यात तेल घालून त्यांना अहोरात्र काम करावे लागते. त्यामुळे तणाव झटकून टाकण्यासाठी भारतीय जवान काहीना काही गोष्टी करत असल्याचे पाहायला मिळते. करोनाच्या काळातही भारतीय जवान तणावापासून दूर राहण्यासाठी खास शक्कल लढवत आहेत.
सेहवागने जो हा व्हिडीओ शेअर केला आहे त्यामध्ये पाकिस्तानच्या सीमेवरील भारतीय जवान हे भांगडा नृत्य करत आहेत. हे नृत्य करून आपला तणाव दूर करण्याचे काम भारतीय जवान करत आहेत. सेहवागने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओखाली त्याने काही ओळीही लिहिल्या आहेत. सेहवागने लिहिले आहे की, ” पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय जवान भांगडा करून आनंद साजरा करत आहेत. हे पाहताना मला अतीव आनंद होत आहे. त्यांच्यामधील एनर्जी कमाल आहे. जय जवान!”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times