नवी दिल्लीः () ने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये धक्कातंत्र वापरल्याने अनेक जण संभ्रमावस्थेत आहेत. कंपनीने केवळ Redmi K30 फोन लाँच केला. कारण, फोन लाँच होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु, कंपनीने एकच फोन लाँच केला. त्यामुळे शाओमीचा या फोनचे उत्पादन बंद केले जाणार असल्याची घोषणा शाओमीचे उपाध्यक्ष आणि रेडमी ब्रँडचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी केली आहे. या फोनला लाँच करून वर्ष उलटत नाही तोच कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

लू विबिंगने आपल्या विबो पोस्टमध्ये सांगितलेय की, जगभरात Redmi K20 Pro चे ५० लाख हून अधिक जास्त युनिट उपलब्ध करण्यात आलेले आहे. परंतु, फेब्रुवारी २०२० मध्ये या फोनचे उत्पादन बंद करण्यात येणार आहे. रेडमी के२० प्रो ला गेल्यावर्षी मे महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. म्हणजेच फोनला वर्ष पूर्ण होण्यास अजून तीन महिने बाकी आहेत. विशेष म्हणजे, लू विबिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये हे स्पष्ट केले नाही की, रेडमी के २० प्रो हा फोन केवळ चीनमधून हटवण्याचा निर्णय घेतला आहे की, भारतातूनही हा फोन बाद करण्यात येणार आहे. यासंबंधी Xiaomi India ला विचारले असता शाओमीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, रेडमी के२० सीरिज चे फोन भारतात सध्या तरी विकले जातील. कारण, भारतात रेडमीची नंबर वन सीरिज आहे.

रेडमी के२० प्रो चे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला म्हणजे कंपनी लवकरच रेडमी के३० प्रो लाँच करण्याच्या तयारीत आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. एका रिपोर्टनुसार, शाओमी आपला रेडमी के30 प्रो ला मार्च महिन्यात लाँच करू शकते. गीकबेंच लिस्टिंगच्या माहितीनुसार, रेडमी के३० प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम असणार आहे. रेडमीच्या या फोनमध्ये चार रियर कॅमेरे असणार असून त्यातील एक ६४ मेगापिक्सलचा Sony IMX686 सेन्सर देण्यात येणार आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here