Mobile Internet Speed : भारतात पुढील काही महिन्यात ५जी नेटवर्क उपलब्ध होणार आहे. परंतु, अद्याप भारतीय यूजर्सला फास्ट ४जी इंटरनेट स्पीड देखील उपलब्ध नाही. 5G Network आल्यानंतर स्ट्राँग कव्हरेज आणि सुपर फास्ट इंटरनेट स्पीड मिळेल, असा दावा केला जात आहे. मात्र, यूजर्सची तक्रार आहे की ४जी च्या नावाखाली २जी स्पीड मिळत आहे. Jio, Airtel आणि Vi या खासगी टेलिकॉम कंपन्या लवकरच ५जी लाँच करणार असल्याचा दावा करत आहे. मात्र, ५जी आधी ४जी इंटरनेट स्पीडमध्ये सुधारणा करा, असे यूजर्स म्हणत आहेत. भारत इंटरनेट स्पीडच्याबाबतीत जगात ११८व्या क्रमांकावर आहे. हा आकडा Ookla ने यावर्षीच्या सुरुवातीला जारी केला होता. भारतात१५ ऑगस्ट १९९५ ला सर्वसामान्यांसाठी इंटरनेट उपलब्ध करण्यात आले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत यात अनेकसुधारणा झाल्या आहेत. परंतु, इंटरनेट स्पीड कमीच आहे. यामागचे कारण काय आहे, त्याविषयी जाणून घेऊया.

​मोबाइल यूजर्सची वाढती संख्या

देशातील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. जेवढे लोक वाढत आहेत, तेवढेच मोबाइल यूजर्सची संख्या देखील वाढत आहे. स्वस्त स्मार्टफोन्स उपलब्ध झाल्याने इंटरनेट मार्केटमध्ये मोठा बदल झाला आहे. याशिवाय, Jio ने मोफत ४जी इंटरनेट उपलब्ध केल्याने यात अधिकच बदल झाला. इंटरनेट यूजर्स आणि डेटा वापराबाबत मोठी वाढ झाली आहे. डेटाची प्रचंड मागणी वाढली आहे व टेलिकॉम कंपन्या ही मागणी पूर्ण करण्यास समर्थ नाही. नेटवर्क व सिग्नलवर जास्त भार पडत असल्याने यूजर्सला देखील याचा सामना करावा लागत आहे.

वाचा: स्वस्त स्मार्टवॉच खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण, ७ दिवसांच्या दमदार बॅटरी लाइफसह Noise ColorFit Vision 2 भारतात लाँच

​स्वस्त डेटा प्लान्स

एखादी गोष्ट महाग असेल तर ती चांगली असते, असे आपण सर्वसाधारणपणे म्हणतो. इंटरनेट डेटाच्याबाबतीत देखील ही गोष्ट लागू होते. इतर देशांच्या तुलनेत भारतात इंटरनेटची किंमत खूपच कमी आहे. Jio, Airtel आणि Vi ने गेल्याकाही दिवसात मोबाइल प्लान्सच्या किंमती वाढवल्या होत्या. स्वस्त डेटा प्लान्समुळे ४जी नेटवर्क जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले. परंतु, यामुळे low-quality 4G networks चा सामना करावा लागत आहे. स्वस्त प्लान्समुळे कंपन्यांच्या उत्पन्नात देखील घट झाली आहे व यामुळे कंपन्यांना नेटवर्क, सिस्टमला अपग्रेड करणे शक्य होत नाहीये.

​इंफ्रास्ट्रक्चर

भारतीय मोबाइल यूजर्सची मोठी संख्या व स्वस्त डेटा प्लान्समुळे भारतातील खासगी टेलिकॉम कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे कंपन्यांना इंफ्रास्ट्रक्चरमध्ये देखील सुधारणा करणे शक्य नाही. Reliance Jio आणि Airtel या कंपन्यांनी देखील ARPU वाढवणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे मोबाइल टॅरिफ प्लान्सच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ होऊ शकते. ARPU चा अर्थ एक मोबाइल यूजर सर्विससाठी सरासरी किती रुपये खर्च करतो. कंपन्यांनी इंफ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा केल्यास सर्विस देखील चांगली होऊ शकते.

वाचा: पावसाळ्यात स्मार्टफोनची घ्या विशेष काळजी, अवघ्या २०० रुपयात मिळत आहे ‘हे’ प्रोडक्ट; पाहा डिटेल्स

​स्पेक्ट्रमचे वाटप

खराब ४जी स्पीडसाठी स्पेक्ट्रम हे देखील मोठे कारण मानले जाते. रिपोर्टनुसार, देशातील लोकसंख्या व मोबाइल यूजर्सच्या तुलनेत ४जी स्पेक्ट्रम खूपच कमी आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सकडे मर्यादित स्पेक्ट्रम असल्याने याचा फटका देखील यूजर्सला बसतो. यामुळे चांगल्या व फास्ट सर्विसची अपेक्षा करणे देखील चुकीचे ठरते. भारतात स्पेक्ट्रमचे वाटप सरकारकडून केले जाते. यामुळे एकप्रकारे याबाबतीत कंपन्या सरकारवर निर्भर असतात. दरम्यान, लवकरच ५जी नेटवर्कसाठी स्पेक्ट्रमचे वाटप होणार आहे. मात्र, कंपन्यांनी महागडे स्पेक्ट्रम खरेदी केल्यास ग्राहकांना देखील सर्विससाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील.

​भारतातील इंटरनेटची स्थिती

जागतिक स्तरावर ४जी इंटरनेट स्पीडबाबत स्टँडर्ड सेट आहे. 4G LTE वर Download Speed १५०Mbps आणि Upload Speed ५०Mbps असणे गरजेचे आहे. तर 4G LTE-Advanced वर सरासरी डाउनलोड स्पीड ३००Mbps आणि अपलोड स्पीड १५०Mbps असणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे भारतात TRAI च्या रिपोर्टनुसार, एप्रिल २०२२ मध्ये जिओ नेटवर्कचा डाउनलोड स्पीड २१.१Mbps होता. जो देशातील इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. एप्रिलमध्ये वीआयचा सरासरी डाउनलोड स्पीड १७.७ Mbps आणि Airtel चा स्पीड १४.१ Mbps होता. तर सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL चा सरासरी डाउनलोड स्पीड ५.९ Mbps होता.

वाचा: Recharge Plan: Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, फक्त १० रुपयात मिळेल अनेक बेनिफिट्स; पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here