मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्मार्टफोन कंपन्या आपले नवीन नवीन स्मार्टफोन लाँच करीत आहेत. अनेक कंपन्या मोठ्या बॅटरीचे स्मार्टफोन लाँच करीत आहेत. परंतु, स्मार्टफोनचा वापर जास्त वाढल्याने स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते, अशा अनेक यूजर्सच्या तक्रारी आहेत. त्यासाठी अनेक जण पॉवर बँकचा सुद्धा वापर करीत असतात. कधी तरी प्रवासात जात असताना फोनची बॅटरी अचानक लवकर संपते. परंतु, तुम्ही जर स्मार्टफोन साठी काही स्मार्ट ट्रिक्सचा वापर केला तर तुमच्या फोनमधील बॅटरी लवकर संपणार नाही. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप चांगला राहावा, लवकर बॅटरी संपू नये, यासाठी काही खास टिप्स बद्दल माहिती देत आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनच्या बॅटरीला सुरक्षित ठेवू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

​जास्त घाम आल्यास फोनचा वापर टाळा

अनेकदा आपण अंघोळ करून येतो व लगेच फोनचा वापर करतो. परंतु, हे धोकादायक आहे. जर तुम्हाला घाम आला असेल किंवा तुम्ही पावसात भिजलेले असाल तर त्यावेळी तुम्ही फोनचा वापर करू नका. याने फोनमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे. फोन खराब होऊ शकतो. किंवा फोनच्या बॅटरीचा ब्लास्ट सुद्धा होऊ शकतो. अशावेळी तुम्ही हेडफोन किंवा स्पीकरचा वापर करू शकता. हे सुरक्षित आहे.

वाचाः Android स्मार्टफोनचे *#07#, *#0228#, *#0*# हे सीक्रेट कोड माहिती आहेत?

​टेंपरेचरची काळजी घ्या

फोन गरम झाल्यास आपल्या फोनच्या बॅटरी कॅपिसिटी गमावते. गरम फोन धोकादायक ठरू शकतो. गिजमोडोवर दिलेल्या माहितीनुसार, ३२ डिग्री पेक्षा जास्त टेंपरेचर वर बॅटरी आपली ६ टक्के बॅटरी गमावतो. याचप्रमाणे टेंपरेचर जास्त असल्यास हा आकडा वाढतो. तसेच जास्त टेंपरेचर मध्ये फोन मध्ये ब्लास्ट होण्याचा धोका वाढतो. जर बाहेर खूप उन असेल तर अशावेळी फोनला अशा जागी ठेवा तेथे फोन गरम होणार नाही. जर जास्त तापमानामुळे फोन गरम होत असेल तर फोनला ऑफ करा. पॉकेटमध्ये ठेवलेला फोन गरम होत असल्याचे आपल्याला जाणवते. अशा वेळी फोनला ऑफ करणे चांगले आहे.

वाचाः WhatsApp Call Recording: WhatsApp वरही कॉल रेकॉर्ड करू शकता, जाणून घ्या सोपी ट्रिक्स

कारच्या डॅशबोर्डवर ठेवू नका

कारच्या डॅशबोर्डवर ठेवू नका

कारमध्ये बसल्यानंतर फोन काढण्यास अडचण येते. त्यामुळे अनेक जण फोनला डॅशबोर्डवर ठेवतात. परंतु, हे फोनसाठी चांगले नाही. समोर काचातून उन थेट फोनवर येत असते. गाडी चालवताना डॅशबोर्ड सुद्धा गरम होते. याने फोनच्या बॅटरीला नुकसान होते. फोन गरम होऊ शकतो. तसेच या मुळे काही फोनमध्ये बॅटरी स्फोट सुद्धा होण्याची भीती आहे. त्यामुळे असे करू नका.

दुसऱ्या चार्जरचा वापर टाळा

हा खूपच महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येक जण सल्ला देतोय की, दुसऱ्या चार्जरचा वापर करणे चांगले नाही. परंतु, का याचे स्पष्ट कारण कोणी देत नाही. परंतु, फोनच्या चार्जरचे पॉवर आउटपूट वेगळे असते. ते तुमच्या फोनच्या बॅटरीला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे दुसऱ्या चार्जरचा उपयोग करणे टाळावे.

वाचा: Recharge Plans: ‘या’ स्वस्त प्लानमध्ये वर्षभर सुरू राहील सिम कार्ड, अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे; पाहा डिटेल्स

​वायरलेस चार्जरपासून राहा दूर

वायरलेस चार्जरपासून राहा दूर

वायरलेस चार्जरने गरमी निर्माण होते. याने फोनला चार्ज केले जाते. परंतु, बॅटरी गरम होत असल्याने ते सोसण्यास सक्षम नसते. त्यामुळे वायरलेस चार्जिंगपासून दूर राहणे फायदेशीर आहे.

चार्जिंगदरम्यान फोन गरम होत असल्यास हे करा

जर फोनच्या चार्जिंग दरम्यान फोन गरम होत असेल तर चार्जिंगमधून फोनला काढणे फायदेशीर राहील. एकदा फोनला रिस्टार्ट करून चार्ज करू शकता. प्लगला चांगल्या पद्धतीने कनेक्ट करू शकता. बॅटरी गरम होत असेल तर एकदा सॉफ्टवेयर अपडेट वर नजर टाका. सॉफ्टवेयर अपडेट करा.

वाचा: Cheapest 5G Smartphones: भारतातील टॉप १० सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्स, किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरू

​फोन लवकर डिस्चार्ज होत असल्यास

फोन लवकर डिस्चार्ज होत असल्यास

जर तुमचा फोन लवकर डिस्चार्ज होत असेल तर वेळीच फोनकडे लक्ष द्या. हे धोकादायक लक्षण ठरू शकते. जुना फोन नेहमी रिस्टार्ट होत असेल तर बॅटरी चेक करा.

बॅटरी फुल झाल्यास

जर तुमच्या फोनची बॅटरी फुल झाली असल्यास फोनची चार्जिंग तात्काळ बंद करा. फोनमध्ये यूनिबॉडी असते. त्यामुळे जास्त वेळ चार्जिंगला ठेवणे चांगले नसते. फोनची बॅटरी फुल झाल्यानंतर जास्त वेळ चार्जिंगला ठेवू नका.

वाचा: Recharge Plans: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान! अवघ्या १० रुपयात अनलिमिटेड व्हॅलिडिटीसह कॉल-एसएमएस बेनिफिट्स; पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here